खंडाळ्याजवळ ऊसाचा ट्रक पलटी; महिलेचा दुर्दैवी मृत्यू.दोन जखमी..

सध्या जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गळीत सुरू असून उसाच्या ट्रकांमध्ये ऊस भरगच्च भरून चालविले जातात. असाच उसाने भरलेला ट्रक आज सायंकाळी खंडाळ्याजवळ श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात खंडाळा येथे राहणाऱ्या उषा बाळासाहेब विघावे या निष्पाप महिलेचा हकनाक बळी गेला तर दोघे जण जखमी झाले आहे.

घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पुढील उपचारासाठी लोणीला पीएमटी येथे नेण्यात आले तर महिलेचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी कामगार रूग्णालयात आणण्यात आल्याचे डॉ.जगधने यांनी सांगितले. उषाबाई विघावे यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!