मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी – इमरान शेख )

-तालुक्यातील खिर्डी येथील गटनं. १ मधील मुस्लीम समाजाच्या स्मशान भूमीवर बेकादेशीरपणे करण्यातआलेले अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाजाच्यावतीने तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की येथील गट नं. १ मध्ये ४० आर क्षेत्रा मध्ये मुस्लीम समाजाची स्मशानभूमी काही लोकांनी येथे बेकायदेशीर रित्या घरे बांधली आहेत.४০ आर क्षेत्रापैकी सुमारे ३० आरक्षेत्रावर गावातील धनदांडग्या लोकांनीअतिक्रमण केले असून येथील रस्त्यावर काट्या, उकिरडा टाकलेला आहे.तसेच शेड बांधलेले आहेत. यामुळे दफन विधीसाठी जागा राहिलेली नाही. काही थोडी फार जागा आहे.त्यामध्ये आमच्या वाड-वड़िलांच्याकबरी आहेत. अतिक्रमीत लोक हेधनदांडगे आहेत. अनेक वेळा सांगून देखील सदर लोक अतिक्रमण काढून घेत नाही.त्यामुळे तहसीलदार यांनी सदर जागेची पाहणी व मोजणी करून तात्काळ अतिक्रमण आपल्या मार्फत काढून द्यावे, अशी मागणी करण्यातआली आहे.

या निवेदनावर मनसू बागवान,रज्जाक बागवान, हारूण बागवान, मुसाबागवान, शाकीर बागवान, जाकीरबागवान, आमन बागवान, मोहमदबागवान, चॉद बागवान, लतीब बागवानयांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!